बौद्ध समाजाला सरपंच उमेदवारी नाही तर 'राजकारणाला रामराम'; सरडे गावातील ज्येष्ठ नेत्यांचा आक्रमक पवित्रा
सरडे (प्रतिनिधी): आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, फलटण तालुक्यातील सरडे गावच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक चर्चा रंगू लागली आहे. गावाच्या राजकारणातील दोन प्रमुख गट आणि ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे यंदाची निवडणूक वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावाच्या विकासात आणि समाजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते सुखदेव बेलदार आणि कांतिलाल बेलदार हे यावेळच्या निवडणुकीत सक्रिय राजकारण करणार नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सेवेसाठी आजवर कष्ट उपसलेल्या या नेत्यांची आता तरुण कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः बौद्ध समाजातील प्रतिनिधींनी पुढे येऊन गावचा गाडा चालवावा, अशी ठाम भूमिका आहे. 'बौद्ध समाजाचा प्रतिनिधी द्या, अन्यथा निवृत्ती' सरडे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्यांकडून केले जात आहे. नागरिकांनी तरुण, हुशार, तडफदार आणि मंत्रालय स्तरावर गावाचे नाव उज्वल करणारा बौद्ध समाजाचा प्रतिनिधी शोधावा, अशी गळ नेत्यांनी घातली ...