हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
फलटण . १ जुलै २०२६ पीराचीवाडी: (ता.फलटण) महाराष्ट्र शासन कृषि विभाग आणि कृषि मित्र शेतकरी स्वयंसहायता समुह यांच्या वतीने, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भारती ग्रीन टेक चे संचालक विनय पोळ यांनी बीज संस्करण आणि विवीध जिवाणू संवर्धणांचे किड नियंत्रण व जमिनीच्या सुपीकते साठी महत्त्व तसेच पिकांना त्रासदायक ठरणाऱ्या हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण याविषयी उपस्थीत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ते म्हणाले की, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रीय पदार्थाचा अधिकाधीक वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमीनी तील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते परिणामी पीका च्या उत्पादन आणि गुणवत्ते मध्ये भरीव वाढ होते. 'एल निनो' हवामान परिस्थीती सावटा च्या पार्श्वभुमीवर स...