बुद्ध जयंती अडथळा निर्माण करणाऱ्या पोलिस निरीक्षक काळे यांना हटवा .. वैभव गीते
जयंतीच्या मिरवणुकीत अडथळा आणल्याचा पोलीस निरीक्षकांवर आरोप फलटण:"युद्ध नको, बुद्ध पाहिजे" असा शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीला फलटणमध्ये गालबोट लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फलटणचे पोलीस निरीक्षक स्वतःला शिस्तप्रिय समजतात, मात्र त्यांच्याच कार्यकाळात शहरात अवैध धंद्यांनी सीमा ओलांडली असून, संविधान मानणाऱ्या जयंती उत्सवात त्यांनी जाणीवपूर्वक अडथळा आणल्याचा आरोप 'नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) संघटनेने केला आहे. शहरात सध्या मटका, गुटखा, जुगार आणि अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. या काळ्या बाजारावर पोलीस प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पोलीस प्रशासन केवळ कागदोपत्री शिस्त दाखवत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. "अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे धाडस न दाखवणारे पोलीस निरीक्षक शांततापूर्ण मार्गाने निघणाऱ्या भीम जयंती आणि बुद्ध जयंतीच्या मिरवणुकीत मात्र खोडा घालत आहेत," अशी टीका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आजवर अनेक अधिकारी फलटणमध्ये आले आणि गेले, मात्र कोण...