Posts

दहिवडीचे पोलीस अंमलदार विशाल वाघमारे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

Image
सातारा जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांचा गौरव करण्यात आला असून, यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याने बाजी मारली आहे. 'नॉन बेलेबल वॉरंट' (NBW) बजावणीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याला "सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार विशाल भीमराव वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे वॉरंट बजावणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये 'नॉन बेलेबल वॉरंट' बजावण्यात दहिवडी पोलीस ठाणे अव्वल ठरले पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी १७ मार्च २०२६ रोजी हे प्रमाणपत्र प्रदान केले आणि भविष्यातही अशीच कामगिरी करण्याची आशा व्यक्त केली.पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे. विशाल भीमराव वाघमारे यांच्या या यशामुळे दहिवडी पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून,...

प्रदीप ऊर्फ प्रेम मोरे यांची 'राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बालसंरक्षण परिषदे'च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

Image
फलटण (प्रतिनिधी): बहुजन समाज पार्टी चे बहुजन चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि फलटण तालुक्यातील धडाडीचे युवा नेतृत्व प्रदीप ऊर्फ प्रेम जयश्री सुरेश मोरे यांची 'राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बालसंरक्षण परिषद' च्या पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी, तर प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया प्रदीप मोरे यांची पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नाशिक येथील मुख्य कार्यालयात परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उद्योजक रामकृष्ण बनसोडे साहेब आणि महिला प्रदेश अध्यक्षा भालेराव ताई यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. १७ वर्षांचा संघर्षमय प्रवास प्रेम मोरे यांनी आपल्या आयुष्यातील १७ वर्षे बहुजन समाज पार्टीचे (BSP) एकनिष्ठ आणि स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून समर्पित केली आहेत. 'एक नेता, एक पक्ष, एक झेंडा' या महापुरुषांच्या विचारांशी बांधील राहून त्यांनी विधानसभा अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. २०१७ मध्ये कोळकी पंचायत समिती, २०१९ मध्ये २५५-फलटण विधानसभा आणि २०२६ मध्ये कोळकी व बरड जिल्हा परिषद ग...

सरडे गावात कमिशनखोर नको, तर कर्तबगार सरपंच हवा!जुन्यांच्या भ्रष्ट कारभाराला आता पूर्णविराम द्या!

Image
निर्भीड आणि सुशिक्षित नेतृत्वाला संधी द्या! सरडे गावचा 'सरपंच' कसा असावा? कमिशनखोर नको तर निर्भीड आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज; ग्रामस्थांचा सूर फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील सरडे गावच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी सरपंच निवडीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जाणार असल्याने गावाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची, याबाबत ग्रामस्थ आणि विशेषतः तरुणांमध्ये कमालीची जागरूकता पाहायला मिळत आहे. "गावचा विकास करणारा सरपंच हवा, कमिशन खाणारा नसावा," अशी स्पष्ट भूमिका आता नागरिक मांडू लागले आहेत. मागच्या काही वर्षांत सरडे गावामध्ये वारंवार सरपंच बदल झाले. सत्तेच्या या खेचाखेचीमुळे गावाच्या शाश्वत विकासाला खिळ बसल्याचे चित्र आहे. ज्यांना यापूर्वी संधी दिली, त्यांनी नेमके काय केले? गावासाठी किती निधी आणला आणि त्यातील किती 'कमिशन' पदरात पाडून घेतले? याचा हिशोब आता तरुण वर्ग मांडू लागला आहे. "ज्यांनी आधी निवडणुका लढवून फक्त स्वतःचे खिसे भरले, अशांना पुन्हा संधी नको," असा सूर गावात उमटत आहे. सरडे गावातील सुज्ञ नागरिक आण...

वृक्ष झाले हैराण... उन्हाळा आला की येते आठवण! आबासो खांडेकर

Image
फलटणची भूमी ही संतांच्या आणि शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या परिसराचे तापमान ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता निसर्गाचा कोप होतोय की काय, अशी भीती सरडे गावात वाटू लागली आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली आणि सूर्याने आग ओकायला सुरुवात केली की, आपल्याला अचानक वृक्षांची आणि त्यांच्या गारव्याची आठवण येते. पण प्रश्न हा आहे की, आपण झाडांची आठवण फक्त चटके बसू लागल्यावरच काढायची का? एकेकाळी फलटणच्या आसपास असलेल्या बागा आणि रस्त्यांच्या कडेला असलेली मोठी झाडे आज विकासकामांच्या नावाखाली दिसेनाशी झाली आहेत. फलटण-सातारा किंवा फलटण-पुणे फलटण आसू की राजळे सरडे मार्गावर प्रवास करताना रस्ते रुंदीकरणात अनेक जुने वटवृक्ष आणि कडुनिंब सह अनेक झाडे तोडली गेली. याचा परिणाम आज शहरासह ग्रामीण भागात वाढत्या उष्णतेत स्पष्टपणे जाणवत आहे. सिमेंटची रस्ते नी घरे तापू लागली की आपल्याला त्या जुन्या कौलारू घरांची, तर जुन्या रस्त्यांची आणि अंगणातील त्या मोठ्या लिंबाच्या झाडाची प्रकर्षाने आठवण येते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण सोयीसाठी झाडे तोडली, पण त्या बदल्यात नवीन झाडे...

फलटण शहरात सार्वजनिक मुतारींची दुर्गंधी; फलक वेगळा : नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, नागरिक हैराण

Image
फलटण (प्रतिनिधी):फलटण शहराचा विस्तार वेगाने होत असताना नागरी सुविधांचा मात्र पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेच्या भागातील सार्वजनिक मुतारींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे पादचारी आणि व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, "नगरपालिका प्रशासन ठोस कारवाई करणार की केवळ दुर्गंधीचा वास घेत बसणार?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. परिस्थितीचे भयावह वास्तव शहरातील बस स्थानक परिसर, गजबजलेले बाजारपेठ सह गडसोली मैदान समोर रामराजे शॉपिंग सेंटर समोर मुख्य रस्त्यांवरील मुतारींची नियमित स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी, या भागातून जाताना नागरिकांना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे. व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे हाल मुतारीच्या शेजारी असलेल्या व्यावसायिकांना या दुर्गंधीचा मोठा फटका बसत आहे. ग्राहकांना दुकानात उभे राहणे कठीण झाले आहे. "स्वच्छ फलटण सुंदर फलटण "च्या नावाखाली केवळ कागदी घो...

फलटण तहसीलदारांचा 'दौरा' नक्की कुठे? कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या; सामान्य जनतेचे हाल

Image
फलटण: तालुक्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र असलेल्या फलटण तहसील कार्यालयात सध्या अजब परिस्थिती पाहायला मिळत आहे. तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव हे नेमके कोणत्या दौऱ्यावर आहेत, की अन्य कोणत्या कामात व्यस्त आहेत, याची कोणतीही अधिकृत माहिती फलटणच्या सामान्य जनतेला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातून शेतकरी आणि कष्टकरी जनता आपली महत्त्वाची कामे आणि कागदपत्रांवर तहसीलदारांची सही घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करून शहरात येतात. कोणी उसने पैसे घेऊन, तर कोणी कोणाची तरी दुचाकी मागून घेऊन तहसील कार्यालय गाठत आहे. मात्र, तासनतास वाट पाहूनही तहसीलदार भेटत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. नागरिकांचे हाल: अनेक वृद्ध आणि महिला नागरिक सकाळपासून कार्यालयासमोर थांबून आहेत. तासनतास वाट पाहिल्यामुळे थकलेले नागरिक तहसील कार्यालयासमोरच आळसाचे जांभळ्या देत बसले असल्याचे चित्र दिसत आहे.  तहसीलदार जर दौऱ्यावर असतील, तर तसा फलक किंवा माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर असणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप नागरिक करत ...

मूळव्याधाबद्दलचे समज व गैरसमज डॉ.अनिल गायकवाड

Image
मूळव्याध भगदर या आजाराबद्दल मोकळेपणाने बोलण्यास सर्व जण टाळतात पण बऱ्याच जणांना हा त्रास असल्याने याची वेवस्थित माहिती करून देणे फार महत्वाचे आहे. गुदद्वारांचे वेगवेगळे आजार असतात. जसे मूळव्याध ( पाईल्स )भगेदर ( फिस्टुला )* फिशर, पायलोनिडल सायनस, पॉलिप प्रोलेप्स अब्सेस या प्रत्येक आजाराची चिकिस्ता वेगवेगळी असते. सुरवातीच्या स्टेजमध्ये डॉक्टरांच्या सल्यानुसार फक्त पथ्य पालन केल्याने व योग्य औषधोपचार घेतल्याने, हे आजार पूर्ण बरे होऊ शकतात. या आजारावर अनेक उपचार आहेत. जसे की इंजेक्शन थेरेपी, लेसर उपचार, स्केलोरो थेरेपी क्षारसूत्र स्टेपलर , THD ऑपरेशन असे अनेक पण या पैकी नेमका कोणता उपचार जास्त फायद्याचा ठरेल.या साठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरतो. *मूळव्याध -1) गुदद्वारांतुन रक्त, येणे कोंब तयार होणे. 2) फिशर शौचाच्या वेळेस आग होणे. दुखणे रक्त पडणे. 3)भगेंदर - गुदद्वाराजवळ फोड येणे. त्यातून पाणी झिरपत राहणे. 4) अब्सेस गुदद्वाराजवळ सूज येणे. भयंकर वेदना होणे. हे सर्व आजार बरे होऊ शकतात. रियांश आयुर्वेदिक क्लिनिक ऑर्थो स्पाईन & पेन मॅनेजमेंट सेंटर मध्ये. रुई सावळ रोड...

फलटण तालुक्यात माती उत्खननाचा मोठा गैरप्रकार; तहसीलदार संशयाच्या भोऱ्यात?एटीएस (ATS) मोजणीद्वारे सखोल चौकशीची मागणी; शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप

Image
फलटण:फलटण तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये माती उत्खननाचा मोठा गोरखधंदा सुरू असून, नियमावली धाब्यावर बसवून हजारो ब्रास मातीचा उपसा केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तहसीलदारांनी गौण खनिज माफियांशी हातमिळवणी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा थेट आरोप  नागरिकांच्या माध्यमातून आता केला जात आहे. शासकीय नियमांनुसार, वैयक्तिक कामासाठी किंवा विशिष्ट कारणास्तव महसूल विभागाकडून प्रति व्यक्ती १०० ब्रास माती उत्खननाची परवानगी दिली जाते. मात्र, फलटण तालुक्यात ज्या ठिकाणी ही परवानगी देण्यात आली आहे, तिथे प्रत्यक्षात हजारो ब्रास माती उत्खनन करण्यात आले आहे. कागदावर १०० ब्रास दाखवून प्रत्यक्षात डोंगराचे डोंगर आणि जमिनी फस्त केल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. मिलीभगत असल्याचा संशय: तहसीलदारांनी माती उपसा करणाऱ्या लोकांशी जवळीक साधून या अवैध उत्खननाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महसूल चोरी: परवानगीपेक्षा कित्येक पटीने जास्त उत्खनन झाल्यामुळे शासनाच्या तिजोरीत जमा होणारा लाखो रुपयांचा निधी बुडाला आहे...

संवेदनशील कार्यतत्पर, समाजाभिमुख चेहरा बहुजनांचे आधारस्तंभ सनी दादा काकडे

Image
संवेदनशील कार्यतत्पर, समाजाभिमुख चेहरा बहुजनांचे आधारस्तंभ सनी दादा काकडे  वाढदिवस विशेष  सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी पेटून उटणारे जीवाची परवा न करता गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज संघर्षनायक बहुजनाचा बेताज बादशहा कामगार संघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष भिमटायगर सनी भाऊ काकडे ..!. सनी दादा काकडे यांचा वाढदिवस हा फलटण तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण समाजासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजातील लोक त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. आशा आहे की ते पुढील काळातही समाजाच्या सेवेसाठी आपले कार्य यशस्वीरीत्या सुरू ठेवतील., संवेदनशील कार्यतत्पर, समाजाभिमुख चेहरा म्हणजेच सनी दादा काकडे नित्याच्या कर्तव्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांचा, दलीत बहुजन, समाजातील लोकांचे आधार स्तंभ आज त्यांचा वाढदिवस. महाराष्ट्रातील नव्हे तर विविध राज्यातही विविध लोकांना अन्यायग्रस्तांना जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याच्या मा...

ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने बडतर्फ करा NDMG संघटनेच्या वतीने १० तारखेला पंचायत समिती फलटण येथे उपोषण - वैभव गीते

Image
दालवडी गावचे ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने यांना बडतर्फ करा यासाठी नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने येत्या 10 तारखेला पंचायत समिती फलटण येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गीते यांनी सांगितले आहे. देशभर संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम सर्वत्र सुरू असून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात काही ग्रामपंचायत मध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला नाही म्हणून संघटनेच्या वतीने शेकडो पदाधिकारी यांच्या माध्यमातून सह तालुक्यातील आंबेडकरवादी संघटना तसेच सर्व नागरिक मिळून फलटण पंचायत समितीच्या समोर उपोषण करण्यात येणार आहे. दालवडी गाव मध्ये संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी यांनी दुर्लक्ष केले तर या कडे लक्ष देण्याचे काम प्रामुख्याने विस्तार अधिकारी यांचे होते परंतु या दोघांनी मिळून मुद्दाम कार्यक्रम दालवडी गावात घेतले नसल्याचे काही ग्रामस्थ बोलत आहेत. तालुक्यातही अजून काही अशा ग्रामपंचायत आहेत परंतु गावातील लोकांच्या तक्रारी संघटनेकडे आल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात...

आई प्रतिष्ठानचे कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर- जयश्री तांबे

Image
फलटण शहर प्रतिनिधी:- जुबेरभाई कोतवाल  आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य आयोजित,जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना " *राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार*" जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन द्वारे देण्यात आला आहे. समाज हितासाठी कार्य करण्याची भक्ती आणि तुम्हाला सदैव प्रेरणा देणारे तुमची स्त्री शक्ती यांचा आम्ही आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मानपत्र देऊन गौरव करीत आहे. लाभे स्त्री शक्तीचे वरदान दातृत्व कर्तृत्व महान  व्हावी जगी कीर्ती  तू नवशक्ती मांगल्यमूर्ती  या उक्तीप्रमाणे खालील महिला भगिनींना पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये , सौ. मिनाक्षी संभाजी ढोपे मुख्याध्यापक शाळा- मातोश्री यमुनाबाई लिमये अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा,पडसरे. तालुका- सुधागड जिल्हा -रायगड, सौ.वंदना राहुल हावरे, शाळा पांडेवाडी. ता-वाई, सौ.अलका विजयकुमार पिसाळ शाळा मायणी (मुली)ता- खटाव, सौ.सारिका अमित कदम शाळा पळशी.ता - खंडाळा,सौ.उर्मिला बाळासाहेब वसव शाळा खटकेवस्ती ता- फलटण,श्रीमती.सीमागौरी नवनाथ पवार शाळा बोरगाव  तालुका- सातारा,...

दालवडी गावातील मागासवर्गीय वस्ती मधील दिव्याला वेलींच पांगरून..! ग्रामपंचायत अधिकारी यांचे लक्ष कुठे ?

Image
फलटण तालुक्यातील दालवडी गावातील मागासवर्गीय वस्ती दिवा वेलींच्या झुडपणांचे पांगरून झाले आहे. या ठिकाणी या लाईट असलेल्या पोलच्या खांबावर गेले कित्येक दिवस हे वेलींचे पांगरून जश्या तसे असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी तोंडी सांगून सुद्धा ग्रामपंचायत अधिकारी मुद्दाम पने मागासवर्गीय वस्ती असल्याकारणाने या कडे दुर्लक्ष केल्याचे चर्चा सुरू आहे. याच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संविधान अमृत महोत्सव सुद्धा करण्यात आला नाही. जिल्हाधिकारी यांचे नियम आदेश गटविकास अधिकारी यांचे पत्र असून सुद्धा अमृत महोत्सव साजरा केला नाही म्हणून यांना बडतर्फ करावे यासाठी NDMG संघटनेच्या वतीने येत्या १० तारखेला पंचायत समिती फलटण येथे उपोषण सुद्धा होणार आहे . हेच ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक दालवडी गावात राहत नाहीत मुख्यालय राहत नाहीत असे सुद्धा स्थानिक नागरिक सांगत आहेत संबंधित अधिकारी यांना जाण्याचा येण्याचा मार्ग असताना कित्येक वेळा ये जा करताना पाहिले पन असेल पण मुद्दाम पने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गावातील मुख्य रहदारीचा रोड लगत समाज मंदिर सुद्धा आहे ब...

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो.... वैभव गिते,राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस

Image
महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांना तसेच यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह” आणि मुलींच्या वसतिगृहांना “सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृह” अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 2 मार्च 2026 रोजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची सही आहे. सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ हा शब्द वापरण्यात आला आहे. ‘मागासवर्गीय’ हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो व त्यातून विषमता अधोरेखित होते. त्यामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्यानुसार घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळून ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) येरवडा, पुणे येथे दोन दिवसीय कार्यशाळा कार्यक्रम संपन्न

Image
सौ. दीपा मुधोळ मुंडे (आयुक्त, समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांची प्रमुख उपस्थितीने उत्साहा मध्ये कार्यशाळा संपन्न दिनांक 28/02/2026 व 01/03/2026 रोजी राज्यस्तरीय महिला असेंब्ली अत्यंत जोशपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि संघर्षनिश्चयी वातावरणात पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (PARA – People’s Action for Rural Awakening) आणि Dr. Institute यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील महिला नेतृत्व एकत्र येऊन न्याय, सन्मान आणि संविधानिक हक्कांसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला. पहिला दिवस – 28/02/2026 : न्याय, हक्क आणि सक्षमीकरणाचा स्पष्ट अजेंडा उद्घाटन सत्रात पंचशीला कुंभारकर यांनी स्वागतपर भाषणातून या असेंब्लीमागील भूमिका स्पष्ट केली—महिलांवरील जातीय व लैंगिक अत्याचाराविरुद्ध संघटित, कायदेशीर आणि चळवळीच्या बळावर लढा उभा करणे. डॉ. देबजानी साहू यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट मांडताना तळागाळातील नेतृत्वनिर्मिती व राज्यस्तरीय नेटवर्किंगची गरज अधोरेखित केली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना सौ. दीपा मुधोळ मुंडे (आयुक्त, समाजकल...

सरडे गावाच्या विकासाची नवी प्रेरणा नवी दिशा विकासाचा नायक तरुणांचे नवे नेतृत्व कार्यसम्राट माजी सरपंच "संजय धायगुडे"यशाची एक नवी कहाणी

Image
सरडे गावचे माजी सरपंच संजय धायगुडे यांचा आज वाढदिवस हे ऐक गावातील विकासाचे, तरुणांचे नेतृत्वाचे नवीन प्रतीक आहेत. त्यांच्या नेतृत्वात गावाच्या विकासाच्या विविध पैलूंवर काम केले जात आहे," त्यांनी सामाजिक सामर्पणाच्या भावनेतून गावाच्या विकासाच्या वाटचालीला त्यांच्या कार्यकाळात गती दिली आहे. सरडे गावचे माजी सरपंच म्हणून हे केवळ पद्धतशीर नेतृत्वासाठी नव्हे, तर समाजातील प्रत्येक वर्गाचा तरुणांचा विश्वास आणि आपल्या मनासारखी ऊर्जा मिळण्यासाठी ओळखले जातात. गावाच्या सर्व प्रमुख विकास कामात ते ज्या ऊर्जेने सहभागी होतात,  सरडे गावाच्या विकासात मदतीला असलेले सर्व विकासाचे काम, रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा त्यांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे झाल्या आहेत.  गावातील सर्व वर्ग, विशेषत: गरीब, बेरोजगार आणि वंचितांना न्याय देण्याच्या दृष्टीने कामे आग्रहाने काम पाहणारे नेतृत्व म्हणजे संजय धायगुडे कोव्हिड सारख्या भयंकर आजारात स्वतः स्व खर्चातून, झटणारे. कित्येक लोकांना या काळात सहकार्य केले आहे . हॉस्पिटल असो की घरुपयोगी वस्तू असो २४ तास गावासाठी वे...

कृतिशील शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास : मा.सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर

Image
शिक्षण ही सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. बालकांच्या मध्ये संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असते ते करण्यासाठी विविध साहित्याचा कृतिशील वापर करून गणित , भाषा , सामान्य ज्ञान या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे आपण रुजवू शकतो मुधोजी बालक मंदिर येथील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनात मांडलेल्या सर्व वस्तू उत्तम शैक्षणिक साहित्य आहे असे मत मुधोजी बालक मंदिर येथे आयोजित भव्य बालवाडी साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशालेच्या चेअरमन वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले  कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन सौ. नूतन अजितराव शिंदे, श्रीमती .रणवरे मॅडम याप्रसंगी भारतीय पत्रकार संघ साताराचे पदाधिकारी विकास शिंदे , राजकुमार काकडे , हिंदुराव गायकवाड , गणेश भोईटे , जुबेर कोतवाल , आप्पासाहेब तांबे , शेखर गायकवाड,मुख्याध्यापक रुपेश शिंदे सौ. राजश्री खलाटे , सौ. मंदा चौधरी. सौ. सावंत, सौ. साबळे मॅडम तसेच काकडे मॅडम व शेख मॅडम उपस्थित होते. प्रा विकास शिंदे यांनी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने अभिप्राय व्यक्त करताना बालवाडीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयानुसार प्रदर्शनातील स...

कोळकी येथे वृक्षकटाईमुळे रस्ता बंद; आजार्‍यांच्या जीवाला धोका, प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी

Image
कोळकीत झाडे तोडून रस्ता बंद; आजार्‍यांचे प्राण धोक्यात, फलटण तालुक्यातील कोळकी गावात रस्ता रुंद करण्याच्या नावाखाली झाडे तोडल्यामुळे फलटण-शिंगणापूर रोडवरील महत्त्वाचा रस्ता बंद झाला असून, यामुळे आजार्‍यांना दवाखान्यात नेहण्यास अडचण येत आहे. नागरिकांनी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही रस्ता उघडण्यात आला नसल्याने रात्रीतच उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. कोळकी ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर कॉन्ट्रॅक्टर सुरेश धायगुडे यांच्या कामातून तालुक्यातील अनेक झाडे, विशेषतः लिंबाची सह अनेक झाडे तोडली गेली. यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून, या भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही. नागरिक म्हणतात, "आजार्‍यांना ऐन वेळी दवाखान्यात नेता येणार नाही, प्राण धोक्यात आहेत." ग्रामपंचायतीने लक्ष दिले नसल्याने आरोपही स्थानिकांनी केला आहे. फलटण शहरात "स्वच्छ फलटण, सुंदर फलटण, झाडे लावा झाडे जगवा" असे घोषवाक्य असताना वृक्षकटाई करणे हे विरोधाभासी असल्याचे नागरिक सांगत आहेत. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी कोळकी यांना माहिती दिल्यानंतरही कोणतीही हालच...

इन्स्टाग्रामवर खोटे अकाउंट उघडून चौघानी काढला काटा.. पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांनी एकाच महिन्यात तीन गंभीर गुन्ह्याचा केला कौशल्यपूर्ण तपास.

Image
 प्रतिनिधी.नितीन जगताप बदला घेण्यासाठी इन्स्टाग्रामवर खोटे अकाउंट उघडून रचला ‘हनी ट्रॅप’! गोखळी येथील नीरा नदीतील मृतदेह प्रकरणाचा थरारक उलगडा; पिंप्रद येथील एकाच कुटुंबातील चौघांना अटक पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांनी एकाच महिन्यात तीन गंभीर गुन्ह्याचा केला कौशल्यपूर्ण तपास. दि. 17/02/2026 रोजी 18.00 वा. चे सुमारास गोखळी, ता. फलटण, जि. सातारा गावचे हद्दीत निरानदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असलेल्या स्थितीत ग्रामस्थांना दिसुन आल्यानंतर त्याबाबत प्रथम अकस्मात मयत नोंद करण्यात आले होते. त्याचे तपासामध्ये अनोळखी मृतदेहाची ओळख पटुन ते अंकुश बापू नरबट वय 22 वर्ष, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा याचे असल्याचे निष्पन्न झाले. तो माण तालुक्यातील रहिवाशी असताना त्याचा मृतदेह फलटण तालुक्यातील निरानदीच्या पात्रात कसा मिळुन आला ? याशिवाय प्रेताचे डोक्यावर असणा-या जखमा कशा ? ही शंका पोलीसांना आली. त्यातच मृत हा स्त्रीलंपट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे मुळापर्यंत गेल्यानंतर असे निष्पन्न झाले, की मृत अंकुश बापू नर...

अनुसूचित जातीच्या अत्याचार पिडीतांना संरक्षणाबरोबर न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका- जिल्हाधिकारी संतोष पाटील

Image
सातारा दि.25: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार पिडीतांना संरक्षणाबरोबर न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका आहे. अत्याचार पिडतांचे चार्जशिट न्यायालयात दाखल होण्यासाठी जातीचा दाखला लागतो. ज्या पिडीताकडे जातीचा दाखला नाही अशांची सामाजिक न्याय विभागाने त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन जातीचे दाखले काढून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पिडीतांना जातीचे दाखले मिळावे यासाठी संबंधित प्रातांधिकारी याच्याशी बोलण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत अशांची स्थानिक चौकशी करुन जातीचा दाखला देण्यात येईल, यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा. खून किंवा अत्याचार प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र एका वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याबाबत कार्यवाही पुर्ण करावयाच्या सूचनाही जिल्हाध...

धम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा जयंती साजरी

Image
फलटण : धम्ममित्र बालसंस्कार वर्गामार्फत सोमवार पेठ, फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांची जयंती विधायक उपक्रमातून साजरी करण्यात आली. त्याग, सेवा आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ वाचनालय व परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आयु. चंद्रकांत मोहिते यांच्यासह विद्यार्थ्यांनी त्रिसरण पंचशील, भीमस्मरण, भीम स्तुती आणि बुद्ध पूजेद्वारे केली. धम्ममय वातावरणात उपासिका व उपस्थित नागरिकांनी श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशालजी शिंदे, विक्रम भोसले, प्रदीप खरात व बुवा लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व शाखेचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परामर्श घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आयु. सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना केवळ राजकीय नव्हे, तर सामाज...