Posts

फलटणच्या बांधकाम विभागात 'भैया' राज? अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने ठेकेदार आणि सामान्य जनता वेठीस!

Image
फलटण (प्रतिनिधी): उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपण अनेकदा 'भैया' संस्कृतीबद्दल ऐकले आहे, जिथे सत्तेच्या वरदहस्ताने काही ठराविक व्यक्ती संपूर्ण यंत्रणा चालवतात. मात्र, आता तसाच काहीसा प्रकार फलटण तालुक्यातही सुरू असल्याची चर्चा नागरिक आणि स्थानिक ठेकेदारांमध्ये रंगू लागली आहे. "आधी कामासाठी भैया शोधावे लागत होते, आता काम मिळवण्यासाठी भैयाची वाट पहावी लागते," अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि इतर शासकीय विभागांतर्गत सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांवर स्थानिक अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, एखादा ठेकेदार किंवा नागरिक कामासंदर्भात अधिकाऱ्यांकडे गेला असता, संबंधित अधिकारी सरळ सांगतात की, "आधी 'भैया'ला कॉल करा किंवा त्यांना भेटा." सत्ताधाऱ्यांच्या नावे 'दलाली'? तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या (आमदार-खासदार) नावाचा वापर करून काही ठराविक व्यक्तींची 'भैया' म्हणून नेमणूक करण्यात आल्याची चर्चा आहे. हे 'भैया...

महावितरणचा भोंगळ कारभार: सुट्टीच्या दिवशी रिकाम्या कार्यालयात पंखे सुरूच; वीज बचतीचा संदेश देणाऱ्या विभागाकडूनच उधळपट्टी?

Image
फलटण: एकीकडे सर्वसामान्य नागरिकांनी वीज बिल वेळेत भरावे यासाठी तगादा लावणाऱ्या आणि वीज बचतीचे आवाहन करणाऱ्या महावितरण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. ३१ मार्च रोजी सुट्टीचा दिवस असतानाही फलटण महावितरणच्या कार्यालयातील पंखे विनाकारण सुरू असल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे शासकीय विजेची मोठी नासाडी होत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सर्वत्र कामाची लगबग असते. मात्र, सुट्टीच्या दिवशी महावितरणचे कार्यालय सुरू आहे की बंद, याबाबत स्पष्टता नव्हती. कार्यालयात बिल भरण्यासाठी किंवा कामासाठी कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र होते. असे असतानाही कार्यालयातील सर्वच कक्षांमधील पंखे पूर्ण वेगाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. जिथे कोणीही माणूस उपस्थित नव्हता, तिथेही तासनतास पंखे सुरू राहिल्याने महावितरणच्या या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सीसीटीव्ही तपासण्याची मागणी हे पंखे नेमके कधीपासून सुरू आहेत आणि ते बंद करण्याची जबाबदारी कोणाची होती? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. "कार्यालयातील सीसीटीव्ही फुट...

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण नूतन कार्यकारिणी निवड : अध्यक्षपदी भीमराव लोंढे तर सरचिटणीसपदी केशव ठोंबरे

Image
फलटण : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.या निवडीत अध्यक्षपदी आयु. भीमराव लोंढे, सरचिटणीसपदी आयु. केशव ठोंबरे तर कोषाध्यक्षपदी आयु. राजकुमार रणवरे यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे तसेच माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनेचे कार्य अधिक गतिमान व प्रभावी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी राज्याचे संघटक, पुणे व सातारा प्रभारी तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचा स्वीकार करून कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, संघटनेचे काम करताना समता, बं...

तरुणांनो, रील्स सोडून ग्रामपंचायत कडे वळा; गाव बदलायला वेळ लागणार नाही! संजय धायगुडे

Image
गल्लीत फिरण्यापेक्षा ग्रामसभेत ग्रामपंचायत मध्ये बोला; सोशल मीडियाच्या 'लाईक्स'पेक्षा गावचा विकास ' महत्वाचा  फलटण (प्रतिनिधी): "गावाचा विकास करायचा असेल तर केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून चालणार नाही, तर ग्रामपंचायतीचा कारभार समजून घेणे काळाची गरज आहे. आजच्या तरुणांनी रील्स बनवण्यापेक्षा रस्त्यांच्या प्रश्नांकडे आणि फोटोंना मिळणाऱ्या लाईक्सपेक्षा गावातील स्ट्रीट लाईटच्या सुविधेकडे लक्ष दिले पाहिजे," असे परखड मत आता समाजमाध्यमांतून व्यक्त केले जात आहे. सध्याच्या काळात तरुण पिढी राजकारण आणि समाजकारणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. मात्र, जर तरुणांची ही ऊर्जा आणि ताकद ग्रामपंचायतीच्या कामकाजात गुंतली, तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. गल्लीबोळात वेळ घालवण्यापेक्षा थेट ग्रामसभेत ग्रामपंचायत मध्ये जाऊन गावासमोरील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. गावाच्या विकासासाठी नवा 'मंत्र': रील्सपेक्षा रस्ते महत्त्वाचे: सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा गावातील खराब रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा. ...

खटकेवस्ती येथे 'विजय संकल्प मेळाव्याचे' आयोजन; विकासरत्न सरपंच बापुराव गावडे यांची जय्यत तयारी

Image
खटकेवस्ती: आगामी निवडणुकांचे बिगुल वाजलेले असतानाच, ग्रा. खटकेवस्तीचे लोकप्रिय विकासरत्न सरपंच श्री. बापुराव दत्तात्रय गावडे यांच्या वतीने भव्य 'विजय संकल्प मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. मेळाव्याचे उद्दिष्ट आणि स्वरूप परिसराचा सर्वांगीण विकास आणि जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हा मेळावा अत्यंत कळीचा मानला जात आहे. सरपंच बापुराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली खटकेवस्तीमध्ये झालेल्या विकासकामांचा आढावा आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पांचा संकल्प या मेळाव्यात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा तपशील: वार व दिनांक: शुक्रवार, २७ मार्च २०२६ वेळ: सायंकाळी ठीक ५:०० वाजता आयोजक: श्री. बापुराव दत्तात्रय गावडे (सरपंच, ग्रा. खटकेवस्ती) या मेळाव्याला दिग्गज राजकीय नेते सह परिसरातील नागरिक, तरुण वर्ग आणि प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मेळाव्याच्या माध्यमातून सरपंच गावडे शक्तीप्रदर्शन करत आपल्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आ...

पालकमंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीचा फलटण येथे भीम आर्मी संघटने कडुन निषेध

Image
फलटण : सातारा जिल्हा म्हणले की डोळ्यासमोर उभे राहतो शुरवीरांचा,संतांचा, जवानांचा,क्रांतीसिंहाचा, कर्मवीर आण्णांचा अशा साताऱ्यात निंदनीय घटना घडली ती म्हणजे सातारा जिल्हा परिषद निवडणूकीच्या दरम्यान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांना काही पोलिसान कडून धक्काबुक्की करण्यात आली आपमान स्पद वागणूक देण्यात आली याचे पडसाद राज्य भर उमडले यास अनुसरून आज भीम आर्मी संघटनेने उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला,व संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर करावाईची मागणी करण्यात आली .पुढे सांगितले की येथून पुढे तरी पोलिस प्रशासनाने निःपक्ष पणे आपली भूमिका पार पाडावी व मंत्री व सामान्य जनता यांना सन्मान पुर्वक, वागणूक देऊन पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करावा या पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावेत असे हि मत व्यक्त संघटने कडुन व्यक्त करण्यात आले.. निवेदन देते वेळी..  अजित संभाजी मोरे लक्षण काकडे, सुनील पवार, तेजस भोसले, सनी पवार, तुषार जाधव, विनय कांबळे

साखरवाडी गावांमध्ये श्रीराम नवमी उत्साहात साजरा सात सर्कल हनुमान मंदिरात भक्तीमय वातावरण

Image
प्रतिनिधी.नितीन जगताप. साखरवाडी येथील सात सर्कल मधील श्री हनुमान मंदिरात श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. याप्रसंगी आयोजित विशेष भजनी कार्यक्रमात सात सर्कल भजनी मंडळ आणि गायकवाड वस्ती भजनी मंडळाने सुरेल भजने सादर केली. या मंगलमयी सोहळ्याला परिसरातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष आकर्षण: भक्तीमय वातावरण: रामनामाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. सामूहिक भजने: सात सर्कल व गायकवाड वस्ती भजनी मंडळाने भजने सादर करून भक्तांना मंत्रमुग्ध केले. महिलांचा सहभाग: महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले

वांग (Freckles ) तपकिरी किंवा काळे डाग पिंपल या वर डॉ ए.सी. गायकवाड यांचा सल्ला व मार्गदर्शन

Image
वांग (Frekles) म्हणजे त्वचेवर दिसणारे लहान तपकिरी किंवा काळसर डाग हे विशेषत : चेहरा नाक, गाल, आणि हातावर दिसतात. सूर्यप्रकाशामुळे हे डाग अधिक स्पष्ट होतात. **फ्रेकल्स होण्याची कारणे खालील प्रमाणे* * * जास्त सूर्यप्रकाश (UV किरणे) अनुवांशिक* हार्मोन्स मध्ये बदल* त्वचेची संवेदनशीलता * काही औषधांचा परिणाम * *फ्रेक्लसची लक्षणे* :- लहान तपकिरी डाग उन्हात वाढणारे वांग  * * वेदना किंवा खाज नसते. * *आयुर्वेदिक उपचार* * आयुर्वेदिक मध्ये फ्रेकल्सवर उपचार करताना. शरीराच्या अंतर्गत कारणावर लक्ष दिले जाते. * *वापरली जाणारी औषधे* * हे उपचार हळूहळू परिणाम दाखवतात आणि त्वचेचे संतुलन सुधारण्यास मदत करतात. * *घरगुती उपाय* * कोरफड (Aloe Vera) जेल लावणे. लिंबू आणि मध मिश्रण, बटाट्याचा रस, टोमॅटो रस. * *काळजी आणि प्रतिबंध* * रोज सनस्क्रीन वापरा. * * थेट सूर्यप्रकाश टाळा, भरपूर पाणी प्या, व्हिटॅमिन C युक्त आहार घ्या. * *डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा* * * डाग अचानक वाढत असतील * रंग किंवा आकार बदलत असेल * खाज किंवा रक्तस्त्राव होत असेल.. * *निष्कर्ष* * * फ्रेकल्स ही सामान्य त्वचेची समस्या आहे....

फलटणमधील भारत गॅस एजन्सीचा कारभार रडारवर; प्रशासनाने चौकशी न केल्यास भीम आर्मी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा

Image
फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील भारत गॅस एजन्सीच्या कारभाराबाबत सध्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पाहायला मिळत आहे. या एजन्सीमध्ये विविध स्तरावर आर्थिक अनियमितता आणि घोटाळे होत असल्याचे संशयास्पद प्रकार समोर येत असून, ग्राहकांकडून जादा पैशांची मागणी केली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन भीम आर्मी संघटनेच्या वतीने छेडण्याचा इशारा फलटण तालुका उपाध्यक्ष सुनील पवार यांनी निवेदनाद्वारे दिला  आहे. तालुक्यातील अनेक गॅस ग्राहकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना देताना अधिक पैशांची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी ग्राहकांना मिळणाऱ्या अनुदानाबाबतही (Subsidy) संभ्रम निर्माण केला जात असल्याची चर्चा आहे. गॅस एजन्सीच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे. प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा या सर्व प्रकाराकडे फलटणचे तहसीलदार आणि पुरवठा विभागाने (Supply Department) तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. गॅस वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता अस...

भीम आर्मी संघटनेच्या निवेदनाची दखल D.Y.Sp यांच्या कडून अवैध धंदे , लाँज एजंट वर कारवाई..

Image
फलटण : फलटण शहरातील वाढते अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी पाहता सर्व सामान्य जनते मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ,असता भीम आर्मी संघटनेने याबाबत शहर पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन मस्तावलेल्या अवैध धंदे तसेच बळ जबरीने वेश्या व्यवसाय करणायास भाग पाडणाऱ्या, लाॅज , ऐजंट वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती .याची दखल शहर पोलिस निरीक्षक यांनी न घेतल्याने त्यांच्या निष्काळजीपणा, व अकार्यक्षमतेची तक्रार वरिष्ठ अधिकारी dysp यांच्या कडे केली असता,दखल घेत पोलिस उपअधीक्षक( Dysp)फलटण यांनी शहर पोलिस निरीक्षक यांची कान टोचनी करत अवैध धंदे लाँज, एजंट वर कारवाई केली . असुन व कारवाई चालु असल्याचे हि सांगितले व निवेदन रेकॉर्ड फाईल करण्यात आले आहे असे हि संघटने कडुन सांगण्यात आले .  अजित संभाजी मोरे, सुनिल पवार, तेजस भोसले, सनी पवार, तुषार जाधव

महापुरुषांच्या जयंती उत्सवापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करा; अन्यथा तीव्र आंदोलन! - वैभव गीते

Image
NDMG संघटनेचा फलटण नगरपरिषदेला इशारा; धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त फलटण: शहरातील मुख्य चौकांमध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आगामी काळात येत असलेल्या महापुरुषांच्या जयंती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, हे रस्ते तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘ नॅशनल दलित मुव्हमेंट (NDMG) संघटनेच्या वतीने फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे  देण्यात आला आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहरात सध्या ठिकठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. काम रेंगाळल्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. उत्सवांच्या काळात अडथळा नको येणाऱ्या काळात क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजऱ्या होणार आहेत. या उत्सवांमध्ये भव्य मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात...

फलटण तालुक्यातील साखरवाडी व खामगाव व सुरवडी परिसरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Image
पोलीस प्रशासन कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष प्रधिनिधी. नितीन जगताप  फलटण तालुक्यातील साखरवाडी व खामगाव व सुरवडी, बडेखान गावामध्ये दिवस रात्र खुलेआम हातभट्टी ताडी व हातभट्टी दारू व चक्री गेम व जुगार मटका, गुटखा विक्री इत्यादी अवैध धंदे जोमात या अवैध धंद्यामुळे सदर परिसरातील नागरिक व महिलांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या अवैध धंद्यामुळे लहान मुले व युवा वर्ग याकडे पूर्णपणे ओढला जावून भावी पिढी पूर्णत बरबाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे या बेकायदेशीर धंद्यामुळे परिसरामध्ये रोज गुंडागिरी व दादागिरी अशी कृत्य सुरू असून त्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे पण बदमानीच्या भीतीने याविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस कुणीही करत नाही तसेच या गंभीर बाबीकडे संबंधीत हद्दीतील पोलीस यंत्रणा पाठ फिरवीत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे सदर कुत्यांना पाठबळ देणाऱ्या स्थानिक समाज कटकांच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण करायची व याद्वारे पोलिसांना हाताशी धरून अवैध धंदे जोमात सुरू करुन अमाप संपत्ती मिळवण्याचे संबंधितांचे प्रयत्न सुरू आहेत सदर हद्दीतील बेकायद...

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे यांना फलटणच्या लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छा

Image
फलटण: सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मा. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांची भेट घेऊन त्यांना विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी फलटण तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या दोन प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये फलटण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले आणि सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. सौ. किरणताई निलेश नलवडे, जिल्हापरिषद  सदस्या ऋतुजा अभिजित जगताप  यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फलटण तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. एकाच व्यासपीठावर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या महिला नेतृत्वाने एकत्र येत शुभेच्छांचा वर्षाव केल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सौ. प्रियाताई शिंदे यांच्या भावी वाटचालीस उत्तमोत्तम यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

फलटण तालुक्यातील वीटभट्ट्यांवरील 'माती आणि कोळशा'च्या गौण खनिजाची चौकशी करा

Image
तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा नागरिकांचा आरोप जिल्हा गौण खनिज अधिकारी लक्ष देणार ? फलटण: फलटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून वीटभट्ट्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, या व्यवसायासाठी लागणारी माती आणि वापरला जाणारा कोळसा यांबाबत मोठे गैरप्रकार होत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. "परवाना १०० ब्रासचा आणि उत्खनन १००० ब्रासचे" असा धक्कादायक प्रकार सुरू असून, याकडे तहसील प्रशासनाचे किती लक्ष आहे, असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक वीटभट्टी चालक शासनाकडून ठराविक कमी मर्यादेपर्यंत माती काढण्याचा परवाना घेतात. परंतु, प्रत्यक्षात जमिनीतून त्यापेक्षा दहापट अधिक माती उपसली जात आहे. या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाचा लाखो रुपयांचा रॉयल्टी महसूल बुडत आहे. अवैध कोळशाचा प्रश्न ऐरणीवर मातीसोबतच वीटभट्ट्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोळशाबाबतही संशयास्पद स्थिती आहे. हा कोळसा नेमका कुठून येतो? तो वैध मार्गाने खरेदी क...

सांगवी सोनगाव-सरडे रस्त्यावर खड्डे की 'मृत्यूचे सापळे'?प्रशासकीय झोप आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार

Image
प्रतिनिधी सरडे  सांगवी, सोनगाव आणि सरडे या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार नक्की कोणाचे हित जोपासत आहेत, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. कामाचा केवळ फार्स? मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम 'खड्डे बुजवण्यासाठी' आहे की केवळ 'दाखवण्यासाठी', असा प्रश्न पडतो. एका ठिकाणी खड्डा बुजवला तर दुसरा तसाच उघडा ठेवला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे पुन्हा जैसे थे होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे आणि प्रवाशांचे हाल या रस्त्यावरून दररोज शेकडो शेतकरी आपल्या शेतमालाची ने-आण करतात. मात्र, रस्त्यावर 'खड्डे आहेत की गड्डे' हेच समजेनासे झाले आहे. "येथून प्रवास करताना जीव मुठीत धरून किंवा हात गळ्यात घालूनच प्रवास करावा लागतोय का?" असा उपरोधिक सवाल प्रवाशांनी विचारला आहे. अधिकारी झोपलेत की काय? रस...

फलटण विश्रामगृहात NDMJ चे राज्य सचिव वैभव गीते यांचा अपमान; शिपाई वर कारवाईची मागणी

Image
फलटण (प्रतिनिधी): नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) संघटनेचे राज्य सचिव आणि उपविभागीय दक्षता समितीचे केंद्रीय नामनिर्देशित सदस्य वैभवजी गीते यांना फलटण येथील शासकीय विश्रामगृहात (Rest House) तेथील शिपाई याने उद्धट वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शासकीय आदेशांचे उल्लंघन करून लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन करणाऱ्या या संबंधित शिपाई वर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. वैभव गीते हे फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातींवरील अन्याय-अत्याचार प्रतिबंधक प्रकरणांत बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. तालुक्यात काही महत्त्वाच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले असताना, ते थोड्या कालावधीसाठी फलटण विश्रामगृह येथे थांबणार होते. यावेळी तेथील कर्तव्यावर असलेल्या शिपायाने त्यांना सहकार्य करण्याऐवजी अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून वेगळ्या दृष्टिकोनातून वागणूक दिली. येथील शिपाई हा गेट लवकर न उघडणे, आलेल्या पाहुण्यांना जाणून बुजून ताटकळत ठेवणे, अपमान करणे, अशा स्वरूपात वागत आहे  आणि काहींना तर वेगळ्या ...

महाडच्या चवदार तळ्यासाठी 55.80 कोटींचा प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल शासनाच्या आभारी आहोत... वैभव गिते

Image
महाड येथील चवदार तळे हे सामाजिक समतेच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते. येथेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह करून अस्पृश्यांनाही सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळावा, यासाठी आवाज उठवला होता. या सत्याग्रहामुळे देशातील सामाजिक क्रांतीला नवी दिशा मिळाली होती. येत्या २० मार्चपासून या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असल्याने यंदाचा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. नॅशनल दलित मुव्हमेंट या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात महाड क्रांतिभूमी सत्याग्रहास शंभरावे वर्ष सुरू होत असल्याने विविध कार्यक्रम उपक्रम शासनामार्फत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे यांच्या वतीने राबवावेत. म्हणून महासंचालक BARTI यांना भेटून वैभव गिते, गोविंद मोरे, आप्पा गायकवाड, भाऊराव तायडे, जय भैया माने, यांनी भेटून निवेदन देऊन चर्चा केली.तसेच शासनास निवेदन पाठवून महाडच्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच महाड प्रांताधिकारी यांच्या उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत ...

दहिवडीचे पोलीस अंमलदार विशाल वाघमारे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

Image
सातारा जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांचा गौरव करण्यात आला असून, यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याने बाजी मारली आहे. 'नॉन बेलेबल वॉरंट' (NBW) बजावणीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याला "सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार विशाल भीमराव वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे वॉरंट बजावणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये 'नॉन बेलेबल वॉरंट' बजावण्यात दहिवडी पोलीस ठाणे अव्वल ठरले पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी १७ मार्च २०२६ रोजी हे प्रमाणपत्र प्रदान केले आणि भविष्यातही अशीच कामगिरी करण्याची आशा व्यक्त केली.पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे. विशाल भीमराव वाघमारे यांच्या या यशामुळे दहिवडी पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून,...

प्रदीप ऊर्फ प्रेम मोरे यांची 'राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बालसंरक्षण परिषदे'च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

Image
फलटण (प्रतिनिधी): बहुजन समाज पार्टी चे बहुजन चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि फलटण तालुक्यातील धडाडीचे युवा नेतृत्व प्रदीप ऊर्फ प्रेम जयश्री सुरेश मोरे यांची 'राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बालसंरक्षण परिषद' च्या पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी, तर प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया प्रदीप मोरे यांची पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नाशिक येथील मुख्य कार्यालयात परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उद्योजक रामकृष्ण बनसोडे साहेब आणि महिला प्रदेश अध्यक्षा भालेराव ताई यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. १७ वर्षांचा संघर्षमय प्रवास प्रेम मोरे यांनी आपल्या आयुष्यातील १७ वर्षे बहुजन समाज पार्टीचे (BSP) एकनिष्ठ आणि स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून समर्पित केली आहेत. 'एक नेता, एक पक्ष, एक झेंडा' या महापुरुषांच्या विचारांशी बांधील राहून त्यांनी विधानसभा अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. २०१७ मध्ये कोळकी पंचायत समिती, २०१९ मध्ये २५५-फलटण विधानसभा आणि २०२६ मध्ये कोळकी व बरड जिल्हा परिषद ग...

सरडे गावात कमिशनखोर नको, तर कर्तबगार सरपंच हवा!जुन्यांच्या भ्रष्ट कारभाराला आता पूर्णविराम द्या!

Image
निर्भीड आणि सुशिक्षित नेतृत्वाला संधी द्या! सरडे गावचा 'सरपंच' कसा असावा? कमिशनखोर नको तर निर्भीड आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज; ग्रामस्थांचा सूर फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील सरडे गावच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी सरपंच निवडीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जाणार असल्याने गावाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची, याबाबत ग्रामस्थ आणि विशेषतः तरुणांमध्ये कमालीची जागरूकता पाहायला मिळत आहे. "गावचा विकास करणारा सरपंच हवा, कमिशन खाणारा नसावा," अशी स्पष्ट भूमिका आता नागरिक मांडू लागले आहेत. मागच्या काही वर्षांत सरडे गावामध्ये वारंवार सरपंच बदल झाले. सत्तेच्या या खेचाखेचीमुळे गावाच्या शाश्वत विकासाला खिळ बसल्याचे चित्र आहे. ज्यांना यापूर्वी संधी दिली, त्यांनी नेमके काय केले? गावासाठी किती निधी आणला आणि त्यातील किती 'कमिशन' पदरात पाडून घेतले? याचा हिशोब आता तरुण वर्ग मांडू लागला आहे. "ज्यांनी आधी निवडणुका लढवून फक्त स्वतःचे खिसे भरले, अशांना पुन्हा संधी नको," असा सूर गावात उमटत आहे. सरडे गावातील सुज्ञ नागरिक आण...