अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांची प्रेरणादायी गाथा”
जिद्द आणि संघर्षातून साकारलेला एक आदर्श शिक्षक: विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा गौरवशाली प्रवास फलटण (प्रतिनिधी): "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे," हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केवळ वाचला नाही, तर तो आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरवून शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे. अत्यंत हलाखीची परिस्थिती, कौटुंबिक संकटे आणि शारीरिक व्याधींवर मात करत त्यांनी शिक्षण क्षेत्रात बजावलेली ३१ वर्षांची सेवा ही येणाऱ्या पिढ्यांसाठी एक वस्तुपाठ ठरली आहे. ३१ मे २०२६ रोजी ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून सन्मानाने सेवानिवृत्त होत आहेत. वडिलांचे छत्र हरपले, पण जिद्द कायम ५ मे १९६८ रोजी फलटण तालुक्यातील सोनगाव येथे जन्मलेल्या विठ्ठल निकाळजे यांचा प्रवास सोपा नव्हता. १९७६ मध्ये वडिलांचे अकाली निधन झाले आणि अवघ्या चौथीच्या वर्गात असतानाच त्यांच्या खांद्यावर संसाराचा भार पडला. परिस्थिती इतकी बिकट होती की, दोन वेळच्या अन्नासाठी रानभाज्या खाऊन आणि ऊस तोडून भूक भागवावी लागली. मात्र, प्रतिकूलतेच्या या अंधारातही त्यांनी शिक्षणाची पंती विझू दिली नाही. परीक्ष...