तरुणांनो, रील्स सोडून ग्रामपंचायत कडे वळा; गाव बदलायला वेळ लागणार नाही! संजय धायगुडे
गल्लीत फिरण्यापेक्षा ग्रामसभेत ग्रामपंचायत मध्ये बोला; सोशल मीडियाच्या 'लाईक्स'पेक्षा गावचा विकास ' महत्वाचा फलटण (प्रतिनिधी): "गावाचा विकास करायचा असेल तर केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून चालणार नाही, तर ग्रामपंचायतीचा कारभार समजून घेणे काळाची गरज आहे. आजच्या तरुणांनी रील्स बनवण्यापेक्षा रस्त्यांच्या प्रश्नांकडे आणि फोटोंना मिळणाऱ्या लाईक्सपेक्षा गावातील स्ट्रीट लाईटच्या सुविधेकडे लक्ष दिले पाहिजे," असे परखड मत आता समाजमाध्यमांतून व्यक्त केले जात आहे. सध्याच्या काळात तरुण पिढी राजकारण आणि समाजकारणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. मात्र, जर तरुणांची ही ऊर्जा आणि ताकद ग्रामपंचायतीच्या कामकाजात गुंतली, तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. गल्लीबोळात वेळ घालवण्यापेक्षा थेट ग्रामसभेत ग्रामपंचायत मध्ये जाऊन गावासमोरील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. गावाच्या विकासासाठी नवा 'मंत्र': रील्सपेक्षा रस्ते महत्त्वाचे: सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा गावातील खराब रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा. ...