विडणी ग्रामपंचायतीत ‘संविधान अमृत महोत्सव’ कार्यक्रमाला सरपंचांचा खो; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
फलटण (प्रतिनिधी):
देशभरात ‘संविधान अमृत महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, फलटण तालुक्यातील विडणी ग्रामपंचायतीत मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीमध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा करणे बंधनकारक होते. मात्र, , संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हा कार्यक्रम करण्यापासून रोखल्याचे समजते. एका बाजूला प्रशासन संविधानाचा गौरव करत असताना, दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे आडकाठी आणत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment