पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?


पिंटू ईवरे यांनी लोकांच्या तक्रारी वाढवल्या राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ; आडनाव माहित नाही आणि जातीचे नाव घेऊन समाज कार्य करणाऱ्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे नागरिक बोलत आहे.
फलटण तालुक्यातील एक मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे, ज्यामध्ये स्थानिक नेते पिंटू ईवरे यांच्या विकास कामांवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

पिंटू ईवरे यांचा तालुक्याचा किंवा गावाचा नेता असल्याबाबतच नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामुळे त्यांना राजीनामा देण्याची मागणी जोर धरली आहे. या भागातील लोकांचे प्राथमिक प्रश्न आणि विकासकार्यांच्या अपयशामुळे आलेली नाराजी वाढत आहे. 

तालुका प्रमुख असलेल्या पिंटू ईवरे यांनी त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील विविध विकास योजना पूर्ण करण्याऐवजी लोकांच्या तक्रारी वाढवल्या आहेत. त्यांनी कोणकोणती कामे केली याचा आढावा घेतल्यास, अनेक लोक म्हणतात की विकासाच्या नावाखाली बडबडाही जास्त झाली आहे. खास करून दलित वस्ती निधी योजना सहकार्यासंबंधी आरोपही त्यांच्या विरोधात समोर येत आहेत. काही नागरिकांनी त्यांच्या भाषेत अनावश्यक शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचे संकेत दिले आहेत. आम्हीं काय बोललो तर " सरकार आमचे असल्याने सरकारपर्यंत गुन्हा दाखल दाखल करू ," असे इवरे काही लोकांना म्हटले आहे.

पिंटू ईवरे यांच्या कार्यपद्धतीवर असंतोष व्यक्त करणारे नागरिक आता त्यांचा लवकरात लवकर राजीनामा देऊन हटण्याची मागणी करत आहेत. विकासकामांच्या आराखड्याबद्दल माहिती मागितली असता, त्यांनी काही लोकांना जातीनिहाय तंजसुद्धा केला. मातंग समाजाच्या प्रतिनिधींशी झालेल्या संवादातही आडनावे न शोधता जातीवरून बोलणे यामुळे स्थानिक नेतृत्वातील तरीही मोठी दुवा तुटलेली दिसते. अशा परिस्थितीत नागरिकांत तिढा निर्माण होत असताना, पिंटू ईवरे यांना त्यांच्या पदावरून हटवावे, अशी अपेक्षा नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

भाग १

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते