गोखळी-तांबवे गावात माती उत्खनन जोमात; तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन होणार का?
फलटण (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील गोखळी आणि तांबवे गावच्या शिवारात सध्या मोठ्या प्रमाणावर माती पास दिल्याने उत्खनन सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे. या उत्खननासाठी महसूल विभागाने परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर तहसीलदारांच्या आदेशातील अटी व शर्तींचे पालन केले जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गोखळी-तांबवे परिसरात विकासकामांसाठी किंवा खाजगी कारणांसाठी माती उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खोल जादा उत्खनन केले जाते. या पार्श्वभूमीवर, महसूल विभागाने दिलेला आदेश केवळ कागदावरच राहणार की त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
'एटीएस' (ATS) मोजणीचे आव्हान
नियमानुसार, उत्खनन पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागेची एटीएस (Advanced Technical Survey) मोजणी होणे अनिवार्य असते. या मोजणीमुळे नक्की किती ब्रास माती उचलली गेली आणि शासनाचा किती महसूल जमा झाला, याचे स्पष्ट चित्र समोर येते. जर ही मोजणी वेळेत झाली नाही, तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणेच उत्खनन होत आहे का?
उत्खनन क्षेत्राची मर्यादा पाळली जात आहे का?
उत्खनन संपल्यानंतर तातडीने 'एटीएस' मोजणी करून अहवाल सादर केला जाईल का?
या प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Comments
Post a Comment