सांगवी सोनगाव-सरडे रस्त्यावर खड्डे की 'मृत्यूचे सापळे'?प्रशासकीय झोप आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार

प्रतिनिधी सरडे 
सांगवी, सोनगाव आणि सरडे या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता सध्या चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार नक्की कोणाचे हित जोपासत आहेत, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कामाचा केवळ फार्स?
मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम 'खड्डे बुजवण्यासाठी' आहे की केवळ 'दाखवण्यासाठी', असा प्रश्न पडतो. एका ठिकाणी खड्डा बुजवला तर दुसरा तसाच उघडा ठेवला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे पुन्हा जैसे थे होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे आणि प्रवाशांचे हाल
या रस्त्यावरून दररोज शेकडो शेतकरी आपल्या शेतमालाची ने-आण करतात. मात्र, रस्त्यावर 'खड्डे आहेत की गड्डे' हेच समजेनासे झाले आहे. "येथून प्रवास करताना जीव मुठीत धरून किंवा हात गळ्यात घालूनच प्रवास करावा लागतोय का?" असा उपरोधिक सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
अधिकारी झोपलेत की काय?
रस्त्याची ही दुरवस्था डोळ्यांसमोर असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपातील पैशांची अक्षरशः उधळपट्टी होत आहे. ? 
अशा चर्चा  नागरिकांमध्ये सुरू आहे

जर या रस्त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले नाही, तर परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?