पोरकं होणं काय असतं, हे ज्याचं त्यालाच ठाऊक...'; विश्वजितराजेंचा तो Satus अन् फलटणकरांच्या डोळ्यांत पाणी!


फलटण:
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरामुळे संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. अशा अत्यंत कठीण प्रसंगी फलटणचे युवा नेते मा. श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी दाखवलेली संवेदनशीलता राजकारणाच्या पलीकडची माणुसकी अधोरेखित करणारी ठरली आहे.

अजितदादांच्या संदर्भात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर माहिती आणि फोटोंचा महापूर आला आहे. मात्र, या चढाओढीत पीडित कुटुंबाच्या भावनांचा विचार कोणी करायचा? हा प्रश्न विश्वजितराजेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवरून जनतेला हात जोडून विनंती केली की, "आजच्या शोकांतिकेशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नका. यामुळे कुटुंबाच्या वेदना फक्त वाढतात."
संवेदनशीलतेचा मापदंड
राजकारणात गट-तट, विचार आणि पक्ष वेगळे असू शकतात. मात्र, वैयक्तिक आयुष्यात जेव्हा अशी मोठी शोकांतिका घडते, तेव्हा एक समाज म्हणून आपण किती प्रगल्भ आहोत, हे श्रीमंत विश्वजितराजेंनी दाखवून दिले आहे. "एका कुटुंबाचे दुःख हे केवळ त्यांचे खाजगी दुःख नाही, तर आपण सर्वांनी त्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा आदर राखला पाहिजे," असा कळकळीचा संदेश त्यांनी दिला आहे.
अनेकदा केवळ फॉरवर्ड करण्याच्या नादात आपण समोरच्याच्या जखमेवर मीठ चोळतो आहोत, याचे भान अनेकांना राहत नाही. अशा वेळी एका जबाबदार नेत्याने पुढाकार घेऊन अशा प्रकारे आवाहन करणे, हे सुसंस्कृत महाराष्ट्राचे लक्षण आहे. श्रीमंत विश्वजितराजे यांचे हे स्टेटस सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, "नेते असावेत तर असे संवेदनशील," अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत.
"दुःख सांगता येत नाही, ते केवळ अनुभवता येते. अशा कठीण समयी अजितदादा आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभे राहताना किमान साधेपण आणि संयम बाळगणे, हीच खरी माणुसकी ठरेल."
या एका आवाहनामुळे फलटणच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी घटनेशी संबंधित फोटो शेअर करणे थांबवले आहे.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?